June 9, 2026 11:40 pm

V1News Telangana

नांदेडच्या वाळू टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह महसूल नुकसानीची शक्यता; विशेष चौकशीची मागणी बिलोली–देगलूर विभागातील लिलाव दरांवरून चर्चांना उधाण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड |
नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर विभागातील वाळू टेंडर प्रक्रियेबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही लोकप्रतिनिधींनी महसूल विभागाच्या संबंधित निर्णयांबाबत पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या वाळू टेंडर प्रक्रियेत देगलूर विभागाचा लिलाव सुमारे ९.५ कोटी रुपयांत झाला. कर व इतर शुल्कांचा समावेश केल्यास हा आकडा १३ कोटी रुपयांच्या आसपास पोहोचतो. याउलट, अधिक वाळू साठा व क्षमता असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या बिलोली विभागाचा लिलाव सुमारे ६.५ कोटी रुपयांत झाल्याची माहिती समोर आली आहे. या दरातील तफावत नेमकी कोणत्या निकषांवर आधारित होती, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक स्तरावर अशीही चर्चा आहे की, बिलोली विभागात सुमारे २१ वाळू घाटांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात साग्रोळी, गुंजीगाव आणि बोलेगाव या काही घाटांवरच उत्खनन सुरू झाल्याचे दिसून आले. उर्वरित घाट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तथापि, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.


राज्य शासनाच्या वाळू धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना नियमनबद्ध व परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे. मात्र, प्रत्यक्षात टेंडर प्रक्रिया, उत्खननाचे प्रमाण, महसूल वसुली आणि उपलब्धतेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून या संदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसून, महसूल विभाग व जिल्हा प्रशासनाने या सर्व बाबींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकशीची गरज का?
बिलोली आणि देगलूर विभागांच्या लिलाव रकमेत मोठी तफावत.
वाळू घाटांच्या कार्यान्वयनाबाबत निर्माण झालेले प्रश्न.
महसूल नुकसानीच्या शक्यतेबाबत स्थानिकांमध्ये सुरू असलेली चर्चा.
टेंडर प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत उपस्थित होत असलेल्या शंका.
या पार्श्वभूमीवर, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊन सर्व संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे

V1News Telangana.& Hindi & Mharti.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.

V1 News & Daily Newspaper is Hiring Reporters V1 News & Daily Newspaper invites applications from enthusiastic and dedicated individuals to join our team as Reporters. Interested candidates can contact: PENDKAR SRINIVAS 📞 9603925163 📞 9834485832

Leave a Comment

Read more
Read more